✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड :- मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस महाराष्ट्रात सम्मानाने जगण्याचा अधिकार’ ही मोहीम राबवित आहे. याअंतर्गत उमरखेड येथे नंदी हॉटेलमध्ये चर्चा टेबल टॉक आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये शहरातील विविध संघटनांच्या जबाबदार व्यक्तींनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या चर्चेत सहभागींनी भारतीय संविधानाने दिलेल्या सन्माननीय जीवन जगण्याच्या अधिकारावर उघडपणे चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला . धर्म, जात, भाषा आणि विविध कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला कसे अपमान सहन करावा लागतो हे सांगितले.

शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाहीत, आजारी लोकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील, गरिबांना अन्नधान्य मिळेल आणि राहण्यासाठी घरे मिळतील. जात, रंग, वंश, धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता सर्वांना सन्माननीय जीवन जगण्याची संधी दिली जाईल असे स्वप्न स्वातंत्र्य सैनान्यांनी पाहिले होते.

संविधानात कलम २१ मध्ये ह्या सर्व बाबी समाविष्ट करण्यात आल्या .पण परिस्थिती उलट आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये गरिबांना धान्य देतांना अपमानित केले जाते, त्यांची प्रतिष्ठा दुखावली जाते, सरकारी रुग्णालयात रुग्णांना गैरवागणूक दिली जाते, जाती आणि भाषेच्या आधारावर लोकांना मारहाण केली जाते. सहभागींना वाटले की यासाठी सरकार जबाबदार आहे. त्यांना आपल्या देशात संविधानाचे राज्य व्हावे आणि लोकांनी जाणीवपूर्वक सन्मानाने जीवन जगावे असे वाटत नाही, तर ते आपले गुलाम बनावे आणि आपल्या दयेवर राहावे आणि आपल्यासमोर नतमस्तक व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी, आपल्याला एक जनजागृती मोहीम चालवावी लागेल की संविधानाने आपल्याला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. आणि हे सरकारी कर्मचारी आपल्याला कसे अपमानित करतात.

सन्मानाने जीवन जगण्यासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे.सहभागींनी एमपीजेच्या या प्रयत्नाचे कौतुक केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्ताफ हुसेन होते. मोहसीन राज यांनी सहभागींचे आभार मानले आणि १ फेब्रुवारी रोजी तपाडिया नाट्य मंदीर , निराला बाजार संभाजी नगर (औरंगाबाद)येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन केले.





